ENGLISH | MARATHI
KORPANA NAGARPANCHAYAT, KORPANA

कोरपना नगरपंचायत, कोरपना


आमच्या बद्दल


कोरपना या शहराला निजामकालीन ऐतिहासिक पाश्वभुमि आहे. कोरपना हे शहर महाराष्ट्र तेलंगना सिमेवर राजुरा-आदिलाबाद हायवेवर वसलेले आहे. हे शहर स्वतःत्र्य पूर्व काळात हैद्राबाद स्टेटला विलीन होते. भारताला १५ ऑगष्ट १९४७ साली स्वतंत्र मिळाले तेव्हाही या शहरावर निजामाचे राज्य होते.

त्या वेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद स्टेट मधुन निजामांना हकलण्याकरीता लष्कर बोलावुन १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाला पराभुत करून हे शहर स्वातंत्र्य भारतात विलिन झाले.

या शहराचा जिल्हा प्रथम निजाम राज्य असल्यामुळे आदिलाबाद होता १७ सप्टेंबर १९४७ नंतर या गावाला नांदेड जिल्हा मराठवाडा येथे जोडण्यात आले. त्या नंतर १ मे १९६० ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्टाचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी वर्धा नदीवर पुलबांधकामास मंजुरी देवुन तेथील पुल बांधल्यानंतर नदी अलिकडील जुना राजुरा तालुका हा चंद्रपूर जिल्हयाला जोडण्यात आला.

नविन कोरपना तालुका १५ ऑगष्ट १९९२ ला अस्तित्वात आला.

नगर पंचायत कोरपनाची स्थापना दिनांक १७ जून २०१५ रोजी झाली.

कोरपना या शहराची आजची लोकसंख्या अंदाजे ७५०० ते ८००० असुन येथे तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, औ.प्र. संस्था, विज वितरण केंद्र, ग्रामिण रुग्णालय, कॉन्वेट पासुन कॉलेज पर्यंत उच्च शिक्षण घेण्याची सोय आज कोरपना येथे आहे. कोरपना हनुमान मंदिर, शारदा मंदिर, दुर्गा मंदिर, राम मंदिर व मस्जिद व पंचशिल भवन या सारखे धार्मीक प्रेक्षणीय स्थळे आहे.

आज कोरपना येथे तहसिल कार्यालया बरोबर गावाला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे शासन व प्रशासन यांचे सहकार्याने विकासाकडे वाटचाल करीत आहे.